मंतरलेल्या त्या आठवणी पुसल्या कशा जातील,
आसव बनून त्या डोळ्यातुन सहज कशा वाहतील
अळवावरच्या थेंबा प्रमाणे मनात त्या साठवुन ठेवावसा वाटतात,
आणि एकांतात मग हळूच काळ्या ढगां सारख्या दाटतात
ह्रिदयात खोल शिरून कधी जखमा करतात,
तर कधी कडक उन्हात मनाला विसावा देणारया सावल्या बनतात
रात्रीच्या रातराणीचा सुगंध मनात पसरवतात,
खोलवर दडलेलं दुख हळुवार त्या विसरवतात
कातरवेळी सुन्न मनाला सख्या बनून आपुलकीने पुसतात,
तर कधी कधी नकळतच आपल्यावर रुसतात
कुणाची साथ जरी नसली तरी सोबत त्यांची असते,
म्हणून दुःखाच्या महासागरात बुडताना उणीव त्यांची भासते.
No comments:
Post a Comment