Friday, 23 August 2013

विरांची थोरवी

प्रणाम त्या विरांना ज्यांनी वाहिले आपुले  रक्त,
प्रणाम त्या महात्म्यांना जे होते खरे देशभक्त
थोर होते ते बलिदानी ज्यांनी देशासाठी केले आपले प्राण अर्पण,
ज्यांनी आपल्या रक्ताने या मातेला करून तिलक केले आपल्या  आयुष्याचे समर्पण
का करता उगाच निंदा त्यांची ?
लढता आली असती का तुम्हाला  लढाई स्वातंत्र्याची
सावरकरांसारखा भोगू शकला असता का कारावास?
उत्तर नाही आहे  तर कलंक का  लावतात  षंढांनो त्यांच्या नावास?

एक थेंब रक्ताचा तरी या देशासाठी दाखवा वाहुनी,
मगच म्हणा स्वतला थोर त्यांच्याहुंनी

No comments:

Post a Comment